Advertisement
पुणे : काही बायका समाज काय म्हणेल या भीतीपोटी वड पूजायला जातात. उरल्यासुरल्या १० – १२ टक्के बायका कपाटात ठेवलेल्या साड्या दाखवायला वड पूजायला जातात. आम्हाला वडाच्या झाडाला फेऱ्या मारणारी सत्यवानची सावित्री फार लवकर समजली पण आमच्या शिक्षणासाठी स्वतःच्या अंगाखांद्यावर शेणामातीचे गोळे झेलणारी ज्योतिबाची सावित्री अजुनही समजली नाही, हे आमचे दुर्दैव. वडाच्या फांद्या तोडून, वडाच्या झाडाला दोरा गुंडाळून निसर्गाचा समतोल बिघडवण्यापेक्षा चार वडाची झाडे लावून वटपौर्णिमा साजरी केल्याचा आनंद निश्चितच समाधानकारक आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी वटपौर्णिमेवर भाष्य केलं आहे.
खडकवासला धायरीसह एकूण २९ ग्रामपंचायतींनी विधवा प्रथा बंदीचा ठराव केला. यावेळी आयोजित कार्यक्रमात चाकणकर यांनी भाष्य केलं. त्या म्हणाल्या, “महिलांना रुढी परंपरांमध्ये जखडून ठेवून तिचा आत्मविश्वास कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. माझा आणि वटपौर्णिमेचा फारसा संबंध येत नाही. मी लग्न झाल्यापासून एकदाही वड पूजलेला नाही. मी आमच्या साहेबांना सांगते की तुम्हाला सात जन्म हीच पत्नी हवी असेल तर तुम्ही वडाला फेऱ्या मारा, आमच्याकडून वड पूजला जाणार नाही. माझ्या सासरच्यांनीही मला आग्रह केला नाही.