#

Advertisement

Thursday, June 16, 2022, June 16, 2022 WIB
Last Updated 2022-06-16T12:52:55Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीयशहर

शेतकरी अडचणीत अन्‌ आमदार हॉटेलात !

Advertisement



शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष; यांना फक्‍त निवडणुकीचं पडलंय
माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी व्यक्‍त केली खंत

सातारा : शेतकरी अडचणीत असताना त्याच्या पाठीवर हात ठेऊन त्याला आधार देण्याचे सोडून राज्यभरातील पुढारी निवडणुकीच्या कारणातून पंचतारांकीत हॉटेलात जाऊन राहिले आहेत. विधान परिषद निवडणुकीत त्यांची डोकी फिरू नयेत यासाठी त्यांची अमृतसेवा केली जात आहे, आजकालच्या या पुढाऱ्यांना शेतकऱ्यांची समाजातील इतर प्रश्‍नांबाबतची आच नाही त्यांना केवळ निवडणुकीचं पडलं आहे, अशी टीका बहुजन रयत परिषदेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी केली.
पश्‍चिम महाराष्ट्रात बहुजन रयत परिषदच्या निवनिर्धार संवाद अभियान दौरा सुरू झाला आहे. यानुसार आज साताऱ्यात झालेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी महिला प्रदेशाध्यक्ष कोमल साळुंखे-ढोबळे, प्रदेशाध्यक्ष रमेश गालफाडे यांच्यासह सातारा शहर आणि जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.
विधान परिषदेची निवडणूूक अवघ्या तीन दिवसांवर आलेली असताना राजकीय पक्षांकडून आमदारांना पंचतारांकीत हॉटेलात नेऊन ठेवण्यात आले आहे. हा धाका पकडून आज माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी आजच्या निवडणुकीच्या काळात चालेल्या गोष्टी तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांसह अन्य समस्यांकडे होणारे दुर्लक्ष याबाबत सडतोड प्रतिक्रिया व्यक्‍त केली. ते म्हणाले की, कोकणात पूर आल्यानंतर शेतकऱ्याची पीकं नाही तर अगदी मातीही वाहून गेली आहे. त्यावेळी अनेक पुढाऱ्यांनी बांधाकवर जावून पाहणी केली परंतु, गेली दोन वर्षे शेतकरी नुकसान भरपाई, मदतीसाठी याचना करतो आहे, याकडे मात्र कोणाचेही लक्ष नाही. आज, पाऊस लांबला आहे, जनावरांपुढे काय चारा टाकू, असा प्रश्‍न शेतकऱ्यांना आहे. अशा स्थितीत विधान परिषद निवडणुकीसाठी आमदारांची डोकी शांत ठेवण्यासाठी त्यांची सरबराई केली जात आहे, अशी टीका करीत शेतकरी, दिनदुबळ्यांच्या पाठीवर हात ठेवणार नेता, पुढारी आता राहिला नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्‍त केली.