#

Advertisement

Thursday, May 23, 2024, May 23, 2024 WIB
Last Updated 2024-05-23T11:33:29Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

आधी टूक वाजलं तरी अण्णा हजारे आंदोलन करायचे, पण आता…!

Advertisement

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यावर रोहित पवार यांची जोरदार टीका 

मुंबई : छोटं टूक वाजलं तरी अण्णा हजारे आंदोलन करायचे. मात्र भाजप सरकारच्या काळात इलेक्ट्रॉल बॉण्डचा घोटाळा झाला. ॲम्बुलन्स घोटाळा झाला. शेतकरी हवालदिल आहेत. बेरोजगारीचा प्रश्न गंभीर बनलाय. मणिपूरमध्ये आणि महाराष्ट्रात महिलांवरती अत्याचार सुरू आहेत. अशावेळी लोकांची अपेक्षा होती की अण्णा हजारे यांनी आंदोलन करावं. पण पण गेल्या दहा वर्षात त्यांचा एकही शब्द आपण ऐकला नाही. लोकांना अण्णांकडून अपेक्षा असताना ते शांत का?, असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे. रोहित पवार यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
एका बाजूला ते स्वतःला नवीन काळचा गांधी समजतात आणि दुसरीकडे भाजपच्या कार्यकाळात सोयीचं आंदोलन करतात. त्यामुळे त्यांनी एक प्रकारे मुखवटा घातलाय, असंच आपल्याला म्हणावं लागेल, असं म्हणत रोहित पवारांनी अण्णा हजारे यांच्यावर टीका केली आहे. अण्णा हजारे यांनी शरद पवरांच्या टीकेला उत्तर देताना त्यांना 12 वर्षांनंतर जाग कशी आली? माझ्या आंदोलनांमुळे यांचे मंत्री घरी गेल्याचा त्यांना राग असावा, असं अण्णा हजारे म्हणाले. त्यावर प्रत्युत्तर देतांना रोहित पवारांनी टीका केली आहे.