Advertisement
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्याला प्रदेशाध्यक्ष पदातून मुक्त करा अशी इच्छा बोलून दाखवली आहे. जयंत पाटलांनी अप्रत्यक्षपणे प्रदेशध्यक्षपदापासून दूर जाण्याची इच्छा बोलून दाखवली असून शरद पवारांनी आता नव्या चेहऱ्याला संधी द्यावी असं मत मांडलं आहे. पुण्यात पक्षाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आयजित मेळाव्यात बोलताना त्यांनी हे भाष्य केलं. यानंतर शरद पवारांनीही आपण त्यांच्या पाठीशी उभं राहावं असं मत मांडलं.
जयंत पाटील भाषणात म्हणाले की, पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणं गरजेचं आहे. यानिमित्ताने तुमच्यादेखत साहेबांना विनंती करत आहे. शेवटी पक्ष शरद पवारांचा आहे. त्यांनी यावर योग्य तो निर्णय घ्यावा. आपल्याला बरंच पुढे जायचं आहे. मी शरद पवारांचे आभार मानतो. या 27 वर्षांच्या काळात पक्षाने राज्यात नाही तर देशात भरीव योगदान दिले. अनेक समाजउपयोग कामं केली आहेत. आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. सुप्रिया सुळे देशाच्या महत्वाच्या शिष्टमंडळत काम करत आहेत. सुप्रिया सुळे सात देश जाऊन माहिती घेऊन आल्या. साहेबांनी देशहित सर्वात महत्वाचे कायम धोरण ठेवले आहे. देशाच्या राजकारणात भीष्मपितामह म्हणून संबोधले जाते. यादरम्यान राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते घोषणाबाजी करत होते.