#

Advertisement

Monday, June 16, 2025, June 16, 2025 WIB
Last Updated 2025-06-16T17:58:50Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

जिल्हा बँकेच्या अध्यक्ष पदावरून बच्चू कडू अपात्र

Advertisement

उपोषण मागे घेताच बच्चू कडूंना दणका

अमरावती : शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी बच्चू कडू यांनी उपोषण सुरू केलं होतं, उपोषणाला स्थगिती देताच त्यांना मोठा धक्का बसला आहे, त्यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांना जिल्हा बँकेच्या अध्यक्ष पदावरून अपात्र करण्यात आलं आहे, यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. मला अपात्र केलं त्याची साधी नोटीस देखील दिली नाही, संविधानाची पायमल्ली करण्याचा प्रयत्न भाजपकडून वारंवार सुरू असल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.
मला अपात्र केलं त्याची साधी नोटीस देखील दिली नाही, संविधानाची पायमल्ली करण्याचा प्रयत्न भाजपकडून वारंवार सुरू आहे. अधिकाऱ्यांना देखील विचारलं पाहिजे, ज्याला अपात्र केलं त्यांना नोटीस दिली का? अमरावतीत काँग्रेस प्रणित भाजप आहे. भाजपची सत्ता आणि काँग्रेसचा वापर करून या प्रकरणात मला गोवल जातं आहे. अन्नत्याग आंदोलन मागे घेतल्यानंतर लगेचच अशापद्धतीने कारवाई होते, हे बरोबर नाही.  कशा पद्धतीने दबाव तंत्राचा वापर केला जाऊ शकतो, याचं हे उत्तम उदाहारण आहे. या अपात्रतेच्या निर्णयावर आम्ही न्यायालयात जाऊ, न्यायालयात आम्हाला न्याय मिळेल, विभागीय निबंधक हा एका मंत्र्याचा नातेवाईक आहे. यावर पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती देणार आहे. अशा पद्धतीने कारवाई होणार हे अपेक्षितच होतं, पण आता आमचं आंदोलन थांबणार नाही, अपात्र केल्याची अद्याप नोटीस नाही, नोटीस आल्यानंतर आम्ही न्यायालयात जाऊ असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.