#

Advertisement

Thursday, June 19, 2025, June 19, 2025 WIB
Last Updated 2025-06-19T11:46:08Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

शिवसेनेच्या स्थापनेपासून तिच्या वाईटावर टपून....

Advertisement

वर्धापन दिनीच UBT चा सामना'च्या अग्रलेखातून हल्लाबोल

मुंबई : आज शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. याच पार्श्वभूमीवर 'सामना'च्या अग्रलेखातून सूचक इशारा देण्यात आला आहे. "मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी आणि हिंदुत्वाच्या रक्षणासाठी निर्माण झालेली शिवसेना 59 वर्षांची झाली. उद्या ती साठ, सत्तर, पंचाहत्तर वर्षांची आणि एक दिवस शंभरी पार करून पुढे जाईल. शिवसेनेचा हा प्रवास नेहमीच खडतर आणि संघर्षाचा राहिला, पण त्या संघर्षाचे, संकटाचे कधी रडगाणे कोणी गायले नाही. लढण्याचे प्रसंग जेव्हा जेव्हा आले, तेव्हा तेव्हा लढणारे शिवसेनेसोबत राहिले आणि रडणारे पळून गेले. शिवसेना आजही त्याच पद्धतीने मार्गक्रमण करीत आहे. शिवसेनेच्या स्थापनेपासून तिच्या वाईटावर टपून बसलेल्या अवलादी आजही आहेत. आपलेच मराठी बांधव खास करून त्यात आहेत," असा घणाघात ठाकरेंच्या शिवसेनेनं केला आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचार पायदळी तुडवून गुजराती व्यापार मंडळाच्या कच्छपी लागलेल्या अवलादीबाबत कुणाला आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. जे लोक छत्रपतींचे स्वराज्य जमीनदोस्त करायला निघाले होते, त्यांच्या अवलादी आज वळवळत आहेत व बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना जमीनदोस्त करून मुंबई-महाराष्ट्राचा घास गुजराती व्यापाऱ्यांच्या घशात घालण्याच्या विचारात आहेत. नव्हे, त्यांनी मुंबईचा सौदा करूनही टाकला, पण जोपर्यंत स्वाभिमानी शिवसेना येथे ठामपणे उभी आहे, तोपर्यंत मुंबईचा तुकडा यांच्या बापजाद्यांना पाडता येणार नाही. शिवसेनेच्या 59 व्या वर्धापनदिनी आमचे मराठी जनतेला हे वचन आहे," अशा कठोर शब्दांमध्ये ठाकरेंच्या सेनेनं हल्लाबोल केला आहे.

अहमदाबाद विमान अपघातातील मृतांच्या चिता विझल्या नाहीत आणि आपले लाडके पंतप्रधान नरेंदर मोदी हे विदेश दौऱ्यावर गेले. आतापर्यंत मोदींनी 200 विदेश दौरे केले असतील. आपल्या दौऱ्यासाठी 20 हजार कोटींचे विशेष ‘आरामदायक’ विमान खरेदी केले. यातून देशाला काय मिळाले?" असा सवाल 'सामना'मधून विचारण्यात आला आहे.