Advertisement
सोलापूर : ज्येष्ठ लेखक, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पक्षिशास्त्रज्ञ आणि वन्यजीव अभ्यासक मारुती चितमपल्ली यांचे निधन झाले आहे. त्यांना नुकताच पद्मश्री पुरस्कार मिळाला होता. पुरस्कार स्विकारण्यासाठी ते दिल्लीला गेले होते. त्यानंतर त्यांची तब्येत खालावल्याने ते आजारी होते. त्यांच्या निधनाने मराठीतील थोर साहित्यिक आणि पक्षीतज्ज्ञ गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.
सोलापूरच्या गिरणी कामगारांच्या घरात जन्मलेल्या चितमपल्ली यांना त्यांच्या जंगल आणि पक्ष्यांविषयीच्या अभ्यासामुळे अरण्यऋषी म्हणून ओळखले जात होते. वनाधिकारी म्हणून सरकारी नोकरी करतानाच त्यांनी वन, वन्यजीव आणि पक्षीशास्त्र या विषयांवर विपुल लेखन केले. त्यांनी पक्षी कोष तयार करायला देखील स्वत:ला वाहून घेतले होते. एका ऋषीतुल्य व्यक्तीमत्वाचा सन्मान यंदा पद्म पुरस्कारानं करण्यात आला होता.