Advertisement
बारामती : हिंदीचा द्वेष करणं विद्यार्थ्यांच्या हिताचं नाही असं मत त्यांनी मांडलं आहे. बारामतीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हिंदी शिकण्यावर भाष्य केलं आहे.
हिदीची सक्ती नको. हिंदी भाषेचा द्वेष करणं विद्यार्थ्यांच्या हिताचं नाही. विद्यार्थ्यांनी यासंबंधी निर्णय घ्यावा. पालक मार्गदर्शन करतील त्यानुसार ते निर्णय घेऊ शकतात. कोणी येत असेल, शिकायचं असेल तर नाही म्हणण्याचं कारण नाही. ही गोष्ट दुर्लक्ष करुन चालणार नाही, असं शरद पवारांनी सांगितलं आहे. पुढे ते म्हणाले की, देशातील 55 ते 60 टक्के लोक हिंदी बोलतात. सुसंवाद ठेवण्यासाठी या भाषेचा द्वेष करणं योग्य नाही. पण सक्ती करणं योग्य नाही.
राज ठाकरेंचा इशारा
एप्रिल महिन्यापासून शिक्षण विभागाचा गोंधळ सुरु आहे. हिंदी सक्तीला आम्ही कडाडून विरोध केला. हिंदी ही नेहमीच ऐच्छिक होती. हिंदी ही असलीच तर राज्यभाषा आहे. त्या राज्यात इतकीह स्थानिक भाषा आहेत. महाराष्ट्रात जेव्हा अशी सक्ती केली जाईल त्याचा विरोध केला जाईल कागदी घोडे नाचवण्यात सरकार हुशार आहे. सरकार छुप्या मार्गाने छपाई करत आहे. शाळांनी सरकारला सहकार्य करु नये. यामधील मराठी भाषेसह, मुलांचंही नुकसान आहे. राजकारणाला तुम्ही बळू पडू नका. मुलं मोठी झाल्यावर गरजेनुसार हवी ती भाषा शिकू शकता. तुम्ही ठाम राहिलात तर आम्ही तुमच्या पाठीशी उभी राहू. पण जर विद्यार्थ्यांवर भाषा लादली तर मनसैनिक चर्चेसाठी येतील असा इशाराच राज ठाकरेंनी महाराष्ट्रातील शाळेंच्या मुख्याध्यपकांना दिला आहे.