Advertisement
मुंबई : महाराष्ट्राची राजधानी मुंबईमध्ये मराठी शाळांना घरघर लागल्याचा पाहायला मिळतंय. मागील 13 वर्षांत मुंबई महापालिकेच्या 131 मराठी शाळा बंद झाल्यात. तर मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांमध्ये तब्बल 45 टक्के घट झालीय. ही आकडेवारी मराठीच्या बाबतीच विचार करायला लावणारी आहे.
मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी पण मुंबईत मराठीच भाषा बोलली जावी असा आपला नेहमी आग्रह असतो. आणि ती जायलाच हवी यात दुमत नाही. मात्र राजधानी मुंबईतच मराठीला घरघर लागल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईत मराठी शाळांचा टक्का घटत असताना 13 वर्षात महापालिकेच्या 131 मराठी शाळा बंद झाल्याचं वास्तव समोर आल आहे.तर मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या 45 टक्क्यांनी घटली आहे. केवळ विद्यार्थीचं नव्हे तर या शाळांमधील शिक्षकांची संख्याही घटली आहे. इंग्रजी शाळांमध्ये प्रवेश घेण्याकडे पालकांचा कल असल्यामुळे मराठी शाळा बंद पडत आहेत.
मुंबईत 2012-13 मध्ये मराठी माध्यमाच्या शाळांची संख्या 385 होती.. तर विद्यार्थी संख्या होती 81 हजार 216 आणि शिक्षकांची संख्या होती 3 हजार 873. 2013-14 मध्ये शाळांमध्ये घट होत शाळांची संख्या 375 वर आली.. तर विद्यार्थी संख्या 69 हजार 330 वर पोहोचली. तर शिक्षकांची संख्या 3 हजार 377 वर पोहोचली.मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालाय. मराठी ही मोठा सांस्कृतिक वारसा असलेली भाषा आहे. पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी... आपुल्या घरात हाल सोसते मराठी अशीच काहीशी मुंबईत मराठीची अवस्था झालीय.. हिंदी इंग्रजी सारख्या भाषा मराठीवर भारी पडताना दिसताहेत. यावर धोरणात्मक निर्णय घेणं गरजेचं आहे.