Advertisement
मनसैनिकांना सैन्यात पाठवा
मुंबई : शिवसेना आणि मनसेने मराठी भाषेच्या मुद्दा उचलल्यानंतर राज्यात काही ठिकाणी हिंसात्मक घटना घडल्या असून, वाद आणखी पेटला आहे. यादरम्यान केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज ठाकरेंना खोचक सल्ला दिला दिला आहे. मराठी भाषेच्या नावाखाली राज ठाकरेंनी दादागिरी करू नये. दादागिरी करायचीच असेल तर मनसैनिकांना सैन्यात पाठवावं असं रामदास आठवले म्हणाले आहेत. सांगलीच्या वाळवा येथील आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
मराठी ही आपली भाषा आहे, पण एखाद्याला मराठी येत नसेल तर त्याला मराठी बोलण्याबाबत सक्ती करू नये. देशाच्या अनेक राज्यात मराठी बांधव राहतात, त्यामुळे राज ठाकरेंनी मराठी भाषेच्या नावाखाली कोणावरही दादागिरी करू नये आणि दादागिरी करायची असेल तर त्यांच्या मनसैनिकांना लष्करात पाठवावं, असा खोचक सल्ला रामदास आठवलेंनी राज ठाकरेंना लगावला आहे.
