Advertisement
मुंबई : लष्करातील भरतीबाबतच्या अग्निपथ अग्निपथ योजनेला देशभरातून विरोध सुरू आहे. उत्तर भारतामध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराचे लोण आता दक्षिण भारतामध्येही पसरले आहे. रेल्वे सेवेला याचा मोठा फटका बसलाय. या विरोधानंतरही या योजनेच्या अमंलबजावणीवर लष्कर ठाम आहे. थल सेना प्रमुख मनोज पांडे यांनी 'एएनआय' या वृत्तसंस्थेशी बोलताना ही माहिती दिली आहे. पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, '2022 मधील भरतीसाठी वयोमर्यादा 23 वर्ष करण्याचा सरकारचा निर्णय आम्हाला मिळाला आहे. कोरोना महामारीच्या काळातही जे भर्ती परीक्षेसाठी तयारी करत होते अशा तरूणांना या निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे. ही प्रक्रिया लवकरच सुरू होणार असून पुढील 2 दिवसांमध्ये http://joinindianarmy.nic.in नोटीफिकेशन जारी करण्यात येणार आहे. त्यानंतर सेना भरतीबाबतचा विस्तृत कार्यक्रम जाहीर करण्यात येईल. डिसेंबर 2022 पूर्वी अग्नीविरांची पहिल्या बॅचचं प्रशिक्षण सुरू होईल.' भारतीय सेनेत सहभागी होण्याची मोठी संधी यामधून प्राप्त झाली आहे, त्याचा फायदा घ्यावा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.