Advertisement
बहुजन रयत परिषदेच्या महिला प्रदेशाध्यक्षा कोमलताई साळुंखे-ढोबळे म्हणतात की...
पुणे : जगातील जुन्या संस्कृतींपैकी भारतीय संस्कृती ही सर्वात जुनी संस्कृती समजली जाते. परंतु, आपल्याकडे पाश्चात्त्य संस्कृती "आधुनिक' मानली जाते. कौटुंबिक जीवनात तर भारतीय संस्कृतीत कुटुंबातील सदस्यांमधील एक उत्तम बंधन आहे जे पाश्चात्य संस्कृतीत दिसून येत नाही. आपल्या भारतीय संस्कृतीत, एक संयुक्त कुटुंब आपल्याला दिसते, यातून आपल्या संस्कृतीवर होणारे पाश्चिमात्य संस्कृतीचे आक्रमण राखले जाते. मात्र, आज समाजातील उच्चस्तर याला अपवाद ठरत असल्याचे दिसून येते. ही सर्व चर्चा करण्यामागेही कारण असेच घडले. दोन छायाचित्र पाहण्यात आली. एक होते अभिनेत्री काजोल आणि दुसरे होते महिला पोलीस वटवृक्षाची पूजा करतानाचे... या दोन्ही छायाचित्रात काजोल हिने "गर्दी' खेचण्यासाठी (फॉलोअर्स) आपल्या कपड्यातून सर्व भारतीय संस्कृती "चुरगाळून' ठेवली होती. तर, दुसऱ्या छायाचित्रात त्यागाचे प्रतिक असलेल्या खाकी रंगाची "वर्दी' घालून महिला पोलीस आपले कर्तव्य बाजावत असताना काहीसा वेळ काढून वटवृक्षाची पूजा वटपोर्णिमेनिमत्त करीत होत्या. ही दोन्ही छायाचित्र आपल्या समाजातील संस्कृतीची दोन्ही टोक दर्शवित होती. पाश्चिमात्य संस्कृती एवढी "खुली' झाली आहे की. या संस्कृतीचे सर्वच पैलू अतिशय गुंतागुतीचे आहेत. जे आपल्या भारतीय संस्कृतीला मान्य होत नाहीत. ड्रेसिंग अर्थातच पोषाख याचा विचार केला तर अतिशय विनम्र पद्धतीची आपली वेशभूषा. अगदी बटण तुटले असले तरी आई-ताई ती स्वत: शिवून देते. उघडणारे कपडे आपल्याकडे वर्ज आहेत. परंतु, "स्टॅन्डर्ड'च्या नावाखाली असेच फाटके, उघडे कपडे आणि विचार आपल्या भारतीय संस्कृतीवर आक्रमण करू पाहत आहेत. आपली संस्कृती भारतीयांना अधिक लाजाळू वाटते. पण, आपणा सर्वांना त्याचा आदर आहे. महिलांना समान हक्क, समान कायदा एकूणच समानतेचे स्थान दिले गेले असले तरी आजही सामान्य कुटुंबातील भारतीय स्त्री भारतीय संस्कृती जपत आहे. जो पर्यंत सामान्य कुटुुबातील स्त्री भारतात आहे तो पर्यंत हे पश्चिमात्य संस्कृतीचे आक्रमण ती परतवून लावेल...असेच त्या महिला पोलिसांच्या वर्दीतील पूजेबाबत म्हणावे वाटते.