Advertisement
मुंबई : भारतीय बँकांकडे दावा न केलेली बेवारस रक्कम सातत्याने वाढत आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या वार्षिक अहवालानुसार, 2021-22 या आर्थिक वर्षात बँकांमधील दावा न केलेली रक्कम 48,262 कोटी रुपयांपर्यंत वाढली आहे. मागील आर्थिक वर्षात ही रक्कम 39,264 कोटी रुपये होती. आता या बेवारस रकमेचे दावेदार शोधण्यासाठी आरबीआयने मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँक त्या 8 राज्यांवर आपले लक्ष केंद्रित केले आहे जिथे जास्तीत जास्त रक्कम जमा केली जाते.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानुसार, जर एखाद्या ग्राहकाने त्याच्या खात्यातून 10 वर्षांपर्यंत कोणताही व्यवहार केला नाही, तर त्या खात्यात जमा केलेली रक्कम अनक्लेम केली जाते. ज्या खात्यातून व्यवहार होत नाहीत ते खाते निष्क्रिय होते. दावा न केलेली रक्कम बचत खाते, चालू खाते, मुदत ठेव आणि आवर्ती ठेव खात्यात असू शकते. दावा न केलेली रक्कम रिझर्व्ह बँकेच्या डिपॉजिटर एज्युकेशन अँड अवेयरनेस फंड (DEAF) मध्ये जमा केली जाते.
NDTV च्या वृत्तानुसार, रिझर्व्ह बँकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, यातील बहुतांश रक्कम तामिळनाडू, पंजाब, गुजरात, महाराष्ट्र, बंगाल, कर्नाटक, बिहार आणि तेलंगणा/आंध्र प्रदेशमधील बँकांमध्ये जमा आहे. रिझव्र्ह बँकेने म्हटले आहे की, बँकांनी अनेक जागरुकता मोहिमा राबवूनही दावा न केलेली रक्कम कालांतराने वाढत आहे.
