#

Advertisement

Tuesday, July 19, 2022, July 19, 2022 WIB
Last Updated 2022-07-19T11:21:30Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

पंतप्रधान, गृहमंत्र्यांची भेट न घेताच मुख्यमंत्री शिंदे यांना परतावे लागणार

Advertisement

नवी दिल्ली : शिवसेनेत बंड पुकारून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले आहे. मात्र, 17 दिवस उलटले तरी अजूनही मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकला नाही. मंत्रिमंडळ विस्ताराच्या आधी एकनाथ शिंदे हे दिल्लीत दाखल झाले आहे. पण, पंतप्रधान मोदी  आणि भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट होणार नसल्याची माहिती समोर आली आहे. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मध्यरात्री 12 वाजेच्या सुमारास दिल्लीत दाखल झाले. दिवसभर भाजपच्या खासदार आणि वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. शिवसेनेचे बंडखोर खासदारांचीही एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली. मात्र, आज पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांची मुख्यमंत्री शिंदे यांची भेट होण्याची शक्यता कमी आहे.
एकनाथ शिंदे यांचा 15 दिवसांतला हा दुसरा दौरा आहे. सरकार स्थापन झाल्यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, जे पी नड्डा यांच्यासह वरिष्ठ नेत्यांच्या भेटीसाठी आले होते. त्यानंतर एकनाथ शिंदे हे पहिल्यांदाच फडणवीस यांच्यासह न येता एकटेच आले आहे. गेल्या काही दिवसांपासून शिंदे सरकाराचा मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेच्या 40 आणि अपक्ष अशा जवळपास 50 पेक्षा जास्त आमदारांनी बंड केलं. एकनाथ शिंदे यांच्यासोबत मागच्या सरकारमधले 8 मंत्रीही सहभागी होते, त्यामुळे त्यांनाही नव्या मंत्रिमंडळात आपल्याला स्थान असेल अशी अपेक्षा आहे. पण, भाजपने मंत्रिमंडळ विस्तारात सर्वाधिक महत्त्वाची खाती ही आपल्याकडेच असणार असं स्पष्ट केलं आहे. शिंदे गटाकडून एकूण 19 खात्यांची मागणी करण्यात आली आहे.