Advertisement
आदित्य ठाकरेंच्या या भाषणामुळे पुन्हा एकदा शरद पवारांच्या साताऱ्याच्या पावसातल्या भाषणाची आठवण झाली. 2019 विधानसभा आणि साताऱ्याच्या पोटनिवडणुकीवेळी शरद पवार यांनी पावसात भिजून सभा घेतली. या सभेमुळे निवडणुकीचं चित्र बदलल्याचं बोललं जातं. विधानसभा निवडणुकीआधी राष्ट्रवादीला मोठ्या प्रमाणावर गळती लागली होती. राष्ट्रवादीचे बडे नेते भाजपमध्ये प्रवेश करत होते. उदयनराजे भोसले यांनीही लोकसभा निवडणूक राष्ट्रवादीच्या तिकीटावर जिंकल्यानंतर काही महिन्यांमध्येच भाजपमध्ये प्रवेश केला, त्यामुळे साताऱ्याची पोटनिवडणूक लागली. या पोटनिवडणुकीत उदयनराजेंना पराभवाचा सामना करावा लागला.
