#

Advertisement

Sunday, October 30, 2022, October 30, 2022 WIB
Last Updated 2022-10-30T11:03:30Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

शिंदे सरकार बरखास्त करण्याचा प्रस्ताव ?

Advertisement

मुंबई : राज्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई आणि विद्यमान राज्य सरकार बरखास्त करण्याची मागणी करण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेसचे एक शिष्टमंडळ उद्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेणार आहे.
विरोधी पक्षनेते अजीत पवार यांच्यानंतर शिवसेना आणि काँग्रेसनेही सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. काँग्रेसचे प्रमुख नेते नाना पटोले हे राज्यपालांना भेटणार असल्याचे ते म्हणाले. पटोले आज(दि.30) माध्यमांसोबत बोलत होते यावेळी त्यांनी राज्यसरकारवही सडकून टीका केली. 
महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात गुजरातला प्रकल्प जाणे थांबले होते. त्यामुळेच मोदी-शाह यांनी ‘ईडी’चा वापर करून हे सरकार पाडून गुजरातच्या तालावर नाचणाऱ्या  कळसूत्री बाहुल्यांचे सरकार आणले. राज्यात सरकार बदलल्यापासून केवळ तीन महिन्यांत वेदांता फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्क, टाटा एअरबस हे मोठे प्रकल्प गुजरातला गेले. काही दिवसांपूर्वी टाटा एअरबसचा प्रकल्प राज्यात येणार म्हणून जाहीरपणे सांगणारे राज्याचे उद्योगमंत्री आता हा प्रकल्प मागील सरकारमुळे राज्याबाहेर गेला, असे खोटे सांगत आहेत. उदय सामंत हे महाराष्ट्राचे उद्योगमंत्री आहेत की गुजरातचे, असा प्रश्न पडतो. असे पटोले म्हणाले