Advertisement
मुंबई : अकोल्यात बोलताना राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यामुळे वाद पेटण्याची शक्यता आहे. या वादात आता मनसेने उडी घेतली आहे. राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर मनसे आक्रमक झाली आहे. राहुल गांधी यांच्या या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी राज्यभरातील मनसैनिकांनी शेगावला जावे, असे थेट आदेशच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिले.
राज ठाकरे यांच्या आदेशानंतर आता मनसेचे कार्यकर्ते शेगावला जाणार आहेत. आज संध्याकाळी मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे आणि पदाधिकारी शेगावला रवाना होणार आहेत. मनसे आक्रमक झाल्यानं आता हा वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे.
