#

Advertisement

Thursday, February 9, 2023, February 09, 2023 WIB
Last Updated 2023-02-09T11:11:01Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

सोलापुरात पाणी पुरवठा 25 दिवस राहणार विस्कळीत

Advertisement

सोलापूर पाण्याच्या टंचाईचा सामना शहरवासीयांना करावा लागणार आहे. शहरातील पाणीपुरवठा 10 फेब्रुवारी पासून विविध कामासाठी तब्बल 25 दिवसापर्यंत 3 ऐवजी 4 दिवसानंतर होणार आहे. त्यामुळे नागरीकांनी पाणी जपून वापरावे, असं आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे. 
सोलापूर स्मार्ट सिटी योजने अंतर्गत स्काडा नियंत्रण प्रणालीचे काम प्रगतीपथावर असून या योजनेअंतर्गत उजनी जलवाहिनीपाकणी जलशुध्दीकरण केंद्रसोरेगाव जलशुध्दीकरण केंद्रभवानी पेठ 
जलशुध्दीकरण केंद्र  टाकळी जलवाहिनी येथे विविध प्रकारचे कामे प्रस्थावित आहेतही कामे 
तातडीने पूर्ण करण्यासाठी वेळोवेळी शटडाऊन राहणार आहे. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठा तब्बल 25 दिवसापर्यंत 3 ऐवजी 4 दिवसानंतर होणार आहे. या निर्णयामुळे शहरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम हाेणार आहे. पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी ही तांत्रिक बाबी सुधारणे गरजेचे आहे. सर्व नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा वापर काटकसलीनं करून महापालिकेला सहकार्य करावं, हेच आमचं नागरिकांना आवाहन आहे. असं महापालिका आयुक्त संदीप करंजे यांनी सांगितलं.