Advertisement
इचलकरंजी : माजी खासदार राजू शेट्टी यांनी गेल्या तीन दिवसापासून मणिपूरसह देशातील महिलांच्यावर होत असलेल्या घटनेच्या निषेधार्थ अन्नत्याग आंदोलन केलं. या आंदोलनादरम्यान त्यांची प्रकृती बिघडली आहे. याबाबतची माहिती आयजीएम सरकारी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं राजू शेट्टी यांनी सलग तीन दिवस अन्नत्याग केल्याने युरिनमध्ये अतिरिक्त कीटोनचे प्रमाण वाढले आहे. यामुळे डिहायड्रेशन, थकवा आणि ताप येऊन शरीरावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. वैद्यकीय तपासणीनंतर अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली..
