Advertisement
वर्धा : येथील महामानव अण्णा भाऊ साठे
समाजाचे सभागृह परत मिळविण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात येत आहे. सर्व समाज
बांधवांनी, सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन आपल्या समाजाचे सभागृह परत
मिळवण्यासाठी एकजुटीने एकत्र यावे, असे आवाहन वर्धा बहुजन रयत परिषदेचे अध्यक्ष अजय
डोंगरे यांनी केले आहे.
वर्धा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष आणि मुख्याअधिकारी यांनी
महामानव अण्णा भाऊ साठे सभागृह समाजापासून चोरून घेतले असल्याचा अरोप करीत ते परत
मिळवण्यासाठी बहुजन रयत परिषद आणि मातंग समाज बांधव तसेच राष्ट्रीय लहु शक्ती तर्फे
धरणे आंदोलन करण्यात येत आहे. दि. 24 पासुर सुरू झालेल्या या आंदालनाचा हा दुसरा
दिवस असून मातंग समाज बांधवांनी एकत्र यावे, असे आवाहन बहूजन रयत परिषदेच्यावतीने
करण्यात आले आहे.
