Advertisement
भविष्यात कोणतेही दहशतवादी कृत्य हे...
दिल्ली : भारताने आता दहशतवादा विरोधात थेट प्रत्युत्तर देण्याची रोखठोक भूमिका घेतली. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला म्हणून भारतीय सैनिकांनी 7 मे रोजी 2025 ला 9 दहशतवादी तळांचा खात्मा करत 100 हून अधिक दहशतवाद्यांचा कंठस्नान घातलंय. यात लष्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनांमधील अनेक धोकादायक दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.
भारत या पुढे गप्प बसणार नसून दशतवाद्याविरोधात भारताने कंबर कसली आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धासारखी परिस्थिती असताना भारताने मोठा निर्णय घेतला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारताने निर्णय घेतला आहे की भविष्यात होणारे कोणतेही दहशतवादी कृत्य भारताविरुद्ध युद्ध मानले जाईल आणि त्यानुसार त्याला प्रत्युत्तर दिले जाईल. भारत सरकारच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले आहे की, आता पुढील कोणताही दहशतवादी हल्ला भारताविरुद्ध युद्ध म्हणून मानला जाईल, आणि त्यानुसार भारत ठोस प्रत्युत्तर देईल.
भारत आणि पाकिस्तान एकमेकांच्या लष्करी सुविधांवर सतत हल्ले करत आहेत, ज्यामुळे सध्या सुरू असलेला संघर्ष धोकादायकपणे वाढत आहे, त्यानंतर हे घडले आहे. पाकिस्तानचे सैन्य आपले सैन्य सीमावर्ती भागात हलवत आहे, असे भारताने आधी सांगितले. "पाकिस्तानी सैन्य सीमावर्ती भागात त्यांचे सैन्य हलवत असल्याचे दिसून आले आहे," असे कर्नल सोफिया कुरेशी यांनी विंग कमांडर व्योमिका सिंग आणि परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांच्यासमवेत पत्रकार परिषदेत सांगितले.
