Advertisement
खासदारांची गांधी विचारांनाच तिलांजली?
वर्धा : महात्मा गांधी आणि विनोबा भावेंची कर्मभूमी असलेल्या वर्धा जिल्ह्यात दारुबंदी उठवण्याची मागणी खासदार अमर काळेंनी केली आहे. वर्धा जिल्ह्यात दारुबंदी कागदावर आहे. त्यामुळं दारुविक्री कायदेशीर करावी असा अजब तर्क अमर काळेंनी मांडला आहे. एवढंच नव्हे तर नकली दारु लोकांना प्यायला देण्यापेक्षा अस्सल दारु पिण्यासाठी दारुबंदी उठवावी] असं तर्कही खासदार महोदय सांगत आहेत.
महात्मा गांधींच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या वर्धा जिल्ह्यात दारुबंदी आहे. आता हीच दारुबंदी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदाराच्या डोळ्यात सलू लागली आहे. खासदार अमर काळे यांनी गांधी आश्रम असलेल्या सेवाग्राम आणि पवनार वगळून दारुबंदी हटवण्याची मागणी खासदार अमर काळेंनी केली आहे. वर्धा जिल्ह्यात दारुबंदी कागदावरच आहे असं अमर काळे सांगतात. दारुबंदीच्या कठोर अंमलबजावणीचा आग्रह धरण्याऐवजी त्यांनी थेट दारुबंदीच उठवण्याची अजब मागणी केली आहे.
भाजपनं दारुबंदी उठवण्याला विरोध केला आहे. पोलिसांनी वर्धा जिल्ह्यातली दारुबंदी कठोरपणे राबवावी अशी मागणी भाजपनं केली आहे. सामान्य वर्धेकरांमधील मद्यप्रेमी मात्र दारुबंदी हटवण्याबाबत तत्वज्ञान सांगत फिरत आहेत. नकली दारु चोरुन पिण्यापेक्षा अस्सल दारु लोकांना पिण्यासाठी दारुबंदी हटवावी अशी वकिली तत्वज्ञान काही वर्धेकर झाडताना दिसता आहेत.