#

Advertisement

Monday, June 9, 2025, June 09, 2025 WIB
Last Updated 2025-06-09T12:05:01Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

शहराबाहेरुन येणारे लोंढे यामुळेच रेल्वे कोलमडली : राज ठाकरे

Advertisement

 मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या दुर्घटनेत 6 प्रवाशांचा मृत्यू

पुणे : मुंबईमधील मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या दुर्घटनेत 6 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. यानंतर पुन्हा एकदा मुंबई लोकलमधील जीवघेणा प्रवास चर्चेत आला आहे. दरम्यान शहरांवर बाहेरुन येणारे आदळणारे लोंढे यामुळेच रेल्वे कोलमडली आहे असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले आहेत. मुंबईच्या रेल्वेत रोज अपघात होत आहेत. अपघात झाला नाही असाही एकही दिवस नाही. रेल्वे नेमक चालती कशी हे जगासाठी आश्चर्यच आहे. अनेकदा मुंबईतील लोकांसाठी वेगळं महामंडळ करा सांगूनही काही होत नाही असं राज ठाकरे पुण्यातील पत्रकार परिषदेत म्हणाले.
या शहरांचं काय झालं हे पाहणं गरजेचं आहे. या सगळ्या शहरांचा विचका झाला आहे. पुनर्विकासाच्या नावाखाली उंच इमारती बांधल्या जात आहेत, मात्र रस्ते नाहीत. रस्ते नसल्याने पार्किंग नाही, त्यामुळे वाहतूक कोंडी होते.  जर कुठे आग लागली तर अग्निशमन दलाचा बंब आत जाऊ शकत नाही अशी सगळ्या शहरांची व्यवस्था आहे. आपल्याकडे शहर नियोजन नावाची गोष्टच नाही. शहरांवर बाहेरुन येणारे आदळणारे लोंढेच यामुळेच रेल्वे यामुळेच कोलमडली आहे, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.
राज ठाकरे म्हणाले, रेल्वे. वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. लोकांना चालण्यासाठी फुटपाथ नाही. वाहनांसाठी रस्ते नाहीत. कोण येतंय, जातंय नाहिती नाही. मेट्रो, मोनो इतर सोयीसुविधा याने प्रश्न सुटणार नाहीत. मुंबईत मोनो, मेट्रो असताना गाड्यांचं रजिस्ट्रेशन थांबलं का? मोने, मेट्रो कोण वापरतंय हे पाहण्यास कोणी तयार नाही. निवडणुका, प्रचारात सगळे गुंतले आहेत. शहरं म्हणून याकडे पाहण्यास कोणी तयार नाही. शहरावर बोलल्यास त्याला किंमत नाही.