#

Advertisement

Friday, October 10, 2025, October 10, 2025 WIB
Last Updated 2025-10-10T13:13:11Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

शेतकऱ्याच्या मुलाने सुरु केली "बाप" आयटी कंपनी

Advertisement

अहिल्यानगर : येथील शेतकऱ्यांचा मुलगा असलेले रावसाहेब घुगे यांनी उच्च शिक्षण पूर्ण केल्यानंतर अमेरिकेत उच्च पगाराची आयटी नोकरी मिळवली, परंतु कोरोना काळात ते आपल्या गावी परतले तेव्हा त्यांनी गावाच्या विकासासाठी काहीतरी करण्याचा संकल्प केला. त्यांनी त्यांच्या गावी माळरानावर एक आयटी कंपनी  सुरु केली. ज्यामुळे शेतकऱ्यांच्या मुलांना आता गावातच लाखो रुपयांची नोकरी मिळत आहे.
रावसाहेब घुगे यांनी त्यांच्या गावातील फोंडा माळरानावर BAAP ही आयटी कंपनी स्थापन केली. त्यांच्या गावात "BAAP (बिझनेस अॅप्लिकेशन अँड प्लॅटफॉर्म्स)" नावाची आयटी कंपनी स्थापन केली. कंपनीने जवळच्या गावातील शेतकऱ्यांच्या मुलांना प्राधान्य दिले. आता, शेतकरी कुटुंबातील मुले त्यांच्या स्वतःच्या गावातील आयटी कंपन्यांमध्ये काम करत आहेत. घुगे यांनी शेतकऱ्यांच्या मुलांसाठी एक विशेष एआय मॉडेल विकसित केले आहे . या मॉडेलमुळे गावातील शिक्षण व्यवस्था सुधारली आहे. मुलांच्या प्रश्नांची त्वरित उत्तरे मिळतात. त्यांनी गावातील तरुणांना आयटी क्षेत्रात प्रशिक्षण देण्यासाठी एक केंद्र देखील स्थापन केले आहे. येथे विविध कोडिंग भाषा आणि इतर आयटी कौशल्ये शिकवली जातात.
रावसाहेब घुगे यांनी आतापर्यंत 600 हून अधिक तरुणांना प्रशिक्षण दिले आहे आणि त्यापैकी 120 हून अधिक तरुणांना आधीच नोकऱ्या मिळाल्या आहेत. ते  पुण्यातील काही कंपन्या त्यांच्यासोबत काम करण्यास इच्छुक आहेत. या उपक्रमाचा प्राथमिक उद्देश ग्रामीण तरुणांना नोकरीसाठी शहरांकडे स्थलांतरित होण्यापासून रोखणे आणि त्यांना त्यांच्या गावात राहून आयटी क्षेत्रात काम करण्याची परवानगी संधी देणे आहे.